पावसाळ्यातील शेती – २०२५ मध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स पावसाच्या सरीत शेतकऱ्याची मेहनत" पावसाळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी. यंदा २०२५ मध्ये हवामान विभागानुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि या वर्षी मानसून लवकर सुरू झालाय. त्यामुळे खरीप हंगामासाठी संधी उत्तम आहे. पण योग्य नियोजन केल्यासच याचा पूर्ण लाभ घेता येईल. पावसाळ्यात शेती करताना महत्त्वाच्या गोष्टी 1. योग्य वेळेवर पेरणी पावसाळा वेळेवर सुरू झाल्यामुळे तूर, उडीद, सोयाबीन, भात यासारखी पिकं वेळेत पेरणं फायदेशीर ठरेल. लवकर पेरणी म्हणजे उत्पादनात वाढ. 2. पाण्याचा योग्य निचरा खूप पाऊस झाल्यास मातीमध्ये पाणी साचतं आणि मुळं कुजतात. त्यासाठी शेतात निचऱ्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे. जसं की – सरीवर पीक घेणं, ओढ्याचं पाणी बाजूला वळवणं. 3. हवामानानुसार पीक निवड काही भागांमध्ये पावसाचा वितरण कमी-जास्त असतो. म्हणून पाऊस कमी झाला तरी टिकणारी पीक निवडावी – मिलेट्स (नाचणी, ज्वारी), माठ, मूग, बाजरी ही पिकं चांगली आहेत. "सोयाबीन शेती – आधुनिक पद्धतीने घेतलेलं पीक" 4. ट्रेंडिंग पीक – सोयाबीन यंदा महाराष्...